Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/19/11

समजून घेताना..

" प्रत्येक माणूस म्हणजे भावनांचा पेटारा असतो... पण बंदिस्त.. अगदी कडी कुलुपात बंद.. बाहेरून  नुसतेच कडक कवच दिसते, परंतु आत मात्र खदखदणारे अद्भुत, अजब रसायन..."
" गम्मत म्हणजे बहुतेकांना या कुलुपाची चावी कुठे शोधायची हेच ठाऊक नसते... मग नुसतेच कवच पकडून बसतात, आपापल्या कुवतीनुसार अर्थ लावतात आणि मग अनर्थ होतात..."
"मग दुसऱ्यांची किल्ली शोधायची तरी कुठे..?"
" पहिल्यांदा स्वत:ला स्वत:ची किल्ली शोधावी लागते. स्वत:ची किल्ली सापडली म्हणजे मग आधी स्वत:चे कवच भेदून आत शिरता येते आणि स्वत:ला समजून घेता येते. स्वत:ला समजून घेता आले, तरच इतरांना समजून घेणे सहजपणे जमते.. एकदा का ही समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली ना, की सगळे गुंते अलगद सुटतात, गैरसमज गळून पडतात.. इंद्रिये स्वछ्च आणि जास्त संवेदनशील होतात.. मग फुलाच्या गळून पडण्याचा नादही टिपता येतो आणि कोड्यात टाकणारी मौनेही बोलकी होतात.. असा माणूस पाण्यासारखा नितळ होऊन जातो.. दृष्टी आतून बाहेर निर्मळ होते.. मग जागा होतो खरा विश्वबंधुभाव.. तेव्हा स्वत:वर आणि इतरांवरही प्रेम करण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत.. ते सहज साध्य होते...
 मनाची क्षितिजे रुंदावतात.. "

3 comments: